पराक्रमी राज
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्योरिव राजते ।
यंदकसेविनो लेखा वर्तते कस्य नोपरी ।।
१४ मे इ. स. १६५७, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा किल्ले पुरंदर वर जन्म. यांनी आपल्या कर्तृत्वाने व पराक्र माने अशी काही दहशत निर्माण केली मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज, डच यांसारख्या बलाढ्य पातशाहींना नामोहरण करून सोडले. जगातील प्रत्येक माता-पित्याला हेवा वाटेल, असा पुत्र माता महाराणी सईबाई व पिता छत्रपती शिवरायांना लाभला.
पुत्र साईबाईंना झाला,
पुत्र शिवराजांना झाला,
पुत्र सह्याद्रीला झाला,
पुत्र महाराष्ट्राला झाला,
पुत्र भारतवर्षाला झाला.
सईबाई साहेबांना सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई या तीन मुलीं नंतर चौथे पुत्ररत्न जन्मास आले. सईराणी साहेब रूपाने सुंदर व मृदू गोड स्वभावाच्या होत्या. म्हणूनच जगतगुरु तुकोबाराय म्हणतात
शुद्ध बिजपोटी । फळे रसाळ गोमटी ।
मुखी अमृताची वाणी । देह वेचावा कारणी ।।
संभाजी महाराजांचे बालपण
युवराज शंभूराजांचे रुबाबदार बाणेदार राजबिंडा वर्णन अनेकांनी केले आहे. त्यात समकालीन नोंदी व इतिहासकारांनी वैशिष्टपूर्ण वर्णन केले आहे.
राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.
संभाजीराजे जन्मतःच अतिशय गुटगुटीत, गोरेपान व देखणे होते. त्यांचे सवरून सुंदर, सतेज होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

वयाच्या १ o व्या वर्षापर्यंत संभाजी महाराजांनी बुद्धभूषणम (संस्कृत), नायिकाभेद, सातसतक, नखशिख (हिंदी) इत्यादी ग्रंथ लिहिणारे जगातील पहिले बालसाहित्य होते. त्यांच्यावर मराठी, हिंदी, पर्शियन, संस्कृत, इंग्रजी, कन्नड इत्यादी भाषांचे प्रभुत्व होते. ज्या वेगाने त्याने पेन उगारला त्याने तलवारही वापरली. बुद्धभूषणम ग्रंथामधल्या एका श्लोक मध्ये त्यांनी आपल्या पुण्यप्रतापी पित्याचं छत्रपती शिवाजी महाराज याचे सुंदर आणि अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे.
संभाजी महाराजांचे पराक्रम
संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर कमी वेळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. संभाजी महाराज यांनी गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. त्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी १२० पैकी एकही लढाई पराजित झालेले नाहीत. संभाजी महाराज असे एकमेव पराक्रमी योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला आहे. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रुंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करण्याची हिम्मत सुद्धा झाली नाही. तसेच त्यापैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या पराक्रमी नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेबाला कित्येक वर्षात एक सुद्धा विजय मिळाला नसल्याने तो चवताळून उठला होता.

संभाजी महाराज हे महातेजस्वी, पराक्रमी, नीतिमान राजे होते. संभाजी महाराज यांचा पराक्रम शाहीर योगेश यांनी आपल्या एका पोवाड्यातून सांगितला आहे.
देश धर्म पर मिटने वाला । शेर शिवा का छावा था ।।
महापराक्रमी परम प्रतापी । एक हि शंभू राजा था ।।
तेज:पुंज तेजस्वी आँखे । निकलगायीं पर झुकी नहीं ।।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नति का | दिव्य स्वप्न तो मिटा नहीं ||
दोनों पैर कटे शंभू के | ध्येय मार्ग से हटा नहीं ||
हात कटे तो क्या हुआ ? | सत्कर्म कभी छूटा नहीं ||
जिव्हा कटी, खून बहाया | धरम का सौदा किया नहीं ||
शिवाजी का बेटा था वह | गलत राह पर चला नहीं ||
वर्ष तिनसों बित गए अब | शंभू के बलिदान को ||
कौन जीता, कौन हारा | पुछलो संसार को ||
कोटि कोटि कंठो में तेरा | आज जयजयकार है ||
अमर शंभू तू अमर हो गया | तेरी जयजयकार है ||
मातृभूमि के चरन कमलपर | जिवन पुष्प चढ़ाया था ||
हे दूजा दुनिया में कोई | जैसा शंभू राजा था ||
संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.
खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.
अशाच अनेक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा – Facebook | Instagram | YouTube वर